मुंबई: लसणाचे दर ४०० च्या वर, भाज्यांचे दर ३० ते ४० रुपयांनी वाढले; कांद्याचे दर २५ ते ३० रुपयांनी घसरले
२५ डिसेंबर २०२४
माझा आवाज प्रतिनिधी पुणे
मुंबईसह राज्यातील बाजारपेठांमध्ये सध्या भाजीपाला आणि शेतमालाच्या दरांमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. लसणाचे दर ४०० रुपयांच्या वर पोहोचले असून भाज्यांचे दर ३० ते ४० रुपयांनी वाढले आहेत. दरवाढीमुळे ग्राहकांना खरेदी करताना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.
दुसरीकडे, कांद्याच्या दरांमध्ये मात्र २५ ते ३० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. कांद्याची आवक वाढल्यामुळे हे दर कमी झाले असून यामुळे शेतकरी वर्गात थोडी नाराजीचे वातावरण असले तरीतर इतर भाजीपाला आणि लसणाच्या दरा बाबत समाधानकारक वाढ झाल्याने समाधानाचे वातावरण आहे. मात्र, लसणाच्या आणि भाज्यांच्या वाढलेल्या दरांमुळे नोकरदार वर्गामध्ये नाराजी पसरली आहे.
शेतकरी समाधानी, पण ग्राहकांच्या खिशाला फटका
शेतकऱ्यांना सध्या लसणाच्या उच्च दरांमुळे चांगला नफा मिळत असला तरी, ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. भाजी विक्रेत्यांच्या मते, येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारेल अशी शक्यता आहे.
माझा आवाजच्या अपडेट्ससाठी कनेक्ट व्हा
भाजीपाला आणि शेतमालाच्या दरांवरच्या अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टलला आणि आमच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा. विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी तुमच्या आवाजाला हक्काचे व्यासपीठ – माझा आवाज!









