राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २३ सप्टेंबर रोजी मुंब्र्यानजीक झालेल्या अक्षय शिंदेच्या चकमकीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणतीही व्यक्ती, गट किंवा संघटना जबाबदार आहे का याची चौकशी हा आयोग करणार आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या पावलांची ही समिती चौकशी करेल तसेच या घटनेशी संबंधित सर्व बाबींची सविस्तर तपासणी करणार आहे.









